Breaking News
  • आनंदाची बातमी: 1 एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होणार
  • रोहितने धडाकेबाज फलंदाजीने रचला सर्वात जलद IPL विक्रम
  • 'केरळम'मध्ये कमळ फुलणार; LDF आणि UDF दोन्ही भ्रष्टाचारी
  • गडचिरोलीत उद्योगांसाठी जमीन अधिग्रहणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
  • माझ्या जीवाला धोका: ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
  • ममता बॅनर्जी यांचा आरोप, भाजप सत्तेत आल्यास बंदी घातली जाईल
  • महाराष्ट्रातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू
  • भानुप्रियाने लग्नाचा सापळा रचून पाच जणांना घातला लाखोंचा गंडा
  • भारतामध्ये गॅस टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर रॉकेलचे वितरण सुरू

होम > शेती

आमदार नितीन देशमुख

जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान

MLA Nitin Deshmukh: अकोला जिल्ह्यात गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ मदतीची मागणी केली.


जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान

MLA Nitin Deshmukh |

पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी: आमदार नितीन देशमुख यांची मागणी

पातूर (MLA Nitin Deshmukh) : अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध भागांत झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपीट झाली. या गारपीटीमुळे कांदा, निंबू, आंबा, टरबूज, हरभरा, भुईमूग तसेच विविध भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांनाही फटका बसला असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. संबंधित यंत्रणांनी विलंब न करता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत त्वरित द्यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच गारपीटग्रस्त भागात विशेष पथके नियुक्त करून सर्वेक्षण जलद गतीने पूर्ण करावे, नुकसानाचा अचूक अहवाल शासनाकडे सादर करावा आणि मदत वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशीही मागणी आमदार देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी केली आहे. सध्या शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related to this topic: