Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > देश

Religious Controversy

'भगवान श्रीकृष्ण मुस्लीम होते, दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत होते';मौलाना जर्जिश अन्सारींचे वादग्रस्त वक्तव्य

भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत एका इस्लामी विद्वानाने केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात नवा वाद निर्माण झाला आहे.


भगवान श्रीकृष्ण मुस्लीम होते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत होतेमौलाना जर्जिश अन्सारींचे वादग्रस्त वक्तव्य

Religious Controversy |

झारखंडमधील कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल; हिंदू संघटनांकडून निषेध, कारवाईची मागणी

भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत एका इस्लामी विद्वानाने केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात नवा वाद निर्माण झाला आहे. झारखंडमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण हे मुस्लीम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत होते, असा दावा केला. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध हिंदू संघटना, संत आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा संदर्भ दिला आहे. त्या श्लोकाचा स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावत त्यांनी, त्यामध्ये वर्णन केलेली ध्यानसाधना ही प्रत्यक्षात नमाज पठणाशी संबंधित असल्याचा दावा केला.

याच वक्तव्यात त्यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबतही अशाच प्रकारचा दावा केला. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांनी इस्लामच्या शिकवणीचा प्रसार केला होता, असेही त्यांनी म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या विधानानंतर अनेक हिंदू धार्मिक संघटना आणि संतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संबंधित वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच काही भाजप नेत्यांनीही या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

माहितीनुसार, हा व्हिडिओ २३ जून २०२६ रोजी झारखंडमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असला तरी सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याचे रहिवासी असलेले मौलाना जर्जिस अन्सारी यांचे यापूर्वीही काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान, देशात कृष्ण जन्मभूमीशी संबंधित न्यायालयीन आणि सामाजिक स्तरावरील चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने या वादाला आणखी वेग आला आहे.

Related to this topic: