CM Himanta Biswa Sarma: आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, पंतप्रधान मोदी आणि इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
पंतप्रधान मोदीसह इतर प्रमुख व्यक्तींची उपस्थिती
गुवाहाटी (Assam CM Oath Ceremony) : आज आसामी राजकारणात एक नवा इतिहास घडला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ईशान्य भारताचे 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. त्यांच्यासोबत चार मंत्र्यांनीही शपथ घेतली. यासह, हिमंता हे आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले आहेत. गुवाहाटीच्या बाहेरील भागात आयोजित या भव्य सोहळ्याकडे एनडीए आघाडी आपल्या राजकीय ताकदीचे आणि सातत्याचे प्रदर्शन म्हणून पाहत आहे.
या शपथविधीमुळे, हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) हे आसामच्या इतिहासात सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद (Assam CM Oath Ceremony) भूषवणारे पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील हे सलग तिसरे एनडीए सरकार असेल. 2016 मध्ये सरबानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा सत्तेवर आल्यापासून, भाजपने राज्य राजकारणावरील आपली पकड लक्षणीयरीत्या मजबूत केली आहे.

गुवाहाटीच्या खानापारा येथे होणारा हा कार्यक्रम एका उत्सवापेक्षा कमी नाही. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य सकाळी 11:40 वाजता सरमा (Assam CM Oath Ceremony) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या हायप्रोफाईल कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह एनडीए-शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
भाजपचे प्रचंड बहुमताने पुनरागमन
नुकत्याच पार पडलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत, एनडीएने 126-सदस्यीय विधानसभेत 102 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. भाजपने एकट्याने 82 जागा जिंकून पहिल्यांदाच बहुमताचा आकडा पार केला. आघाडीतील भागीदार आसाम गण परिषद (एजीपी) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (BPF) यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकून आघाडीची ताकद दाखवून दिली.
मंत्री म्हणून कोण-कोण घेणार शपथ
सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांच्यासोबत इतर चार ज्येष्ठ नेतेही मंत्री म्हणून शपथ घेतील. यामध्ये भाजपचे रामेश्वर तेली आणि अजंता नेओग, एजीपी अध्यक्ष अतुल बोरा आणि बीपीएफ आमदार चरण बोरो यांचा समावेश आहे. याशिवाय, भाजपचे ज्येष्ठ आमदार रणजित कुमार दास यांना आसाम विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.