Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > करीअर

पोलीस भरती निवड

सामान्य कुटुंबातील बहिण-भाऊ पोलीस दलात दाखल

Police Bharti Selection: सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संजना व अमित कावळे यांनी पोलीस भरतीत अडचणी आणि जिद्दाचा जोर वापरून यश मिळवले.


सामान्य कुटुंबातील बहिण-भाऊ पोलीस दलात दाखल

Police Bharti Selection |

 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर घडविले यश

घोट (Police Bharti Selection) : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत घोट (कर्दुळ) येथील संजना विश्वनाथ कावळे व अमित विश्वनाथ कावळे या बहिण-भावांनी पोलीस दलात पात्र होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या या दोघांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळविले.त्यांचे वडील विश्वनाथ कावळे हे ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही मुलांनी शिक्षणासोबत (Police Bharti Selection) पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अखेर पोलीस दलात स्थान मिळविले.

संजना आणि अमित यांच्या यशामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत असून, सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना त्यांनी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचे पाठबळ,मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा ठरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related to this topic: