Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > करीअर

हिंगोली पोलिस भरती

हिंगोलीत पोलिस शिपाई पदाकरीता होणार २९ मार्चला लेखी परीक्षा; ४११ उमेदवार पात्र

Hingoli Police Recruitment: हिंगोलीत पोलिस दल भरती प्रक्रिया सुरु; २९ मार्च रोजी लेखी परीक्षा. उमेदवारांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचा आदेश.


हिंगोलीत पोलिस शिपाई पदाकरीता होणार २९ मार्चला लेखी परीक्षा ४११ उमेदवार पात्र

Hingoli Police Recruitment |

उमेदवारांनी वेळेत हजर राहणे आवश्यक

हिंगोली (Hingoli Police Recruitment) : जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी ११ फेबु्रवारी पासुन भरतीची प्रक्रीया राबविण्यात आली. सर्वसाधारण पोलिस शिपाई पदाकरीता २९ मार्चला हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

हिंगोली शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ११ फेबु्रवारीपासुन (Hingoli Police Recruitment) जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांकरीता भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये इच्छुक उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी उमेदवारांना चक्क पहाटे ४ वाजता मैदानावर प्रवेश दिला. यासाठी अधिकारी व कर्मचारीही सज्ज ठेवण्यात आले होते. मैदानावरील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण पोलिस शिपाई पदाकरीता २९ मार्च रोजी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षा करीता ४११ उमेदवार पात्र ठरले आहेत.

हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयावर सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान लेखी परीक्षा (Hingoli Police Recruitment) घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे सूचना दिल्या आहेत. तसेच उमेदवारांना प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कोणतेही प्रतिबंधक केलेले साहित्य ज्यामध्ये इलेक्टॅनिक साहित्य, वॉच, हेडफोन, मोबाईल इतर प्रतिबंध साहित्य सोबत बाळगू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी केले आहे.

Related to this topic: