Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > करीअर

हिंगोली कॉपीमुक्त परीक्षा

हिंगोलीत दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस प्रारंभ, पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षा

Hingoli Copy-free Examination दहावी व बारावीच्या पुर्वणी परिक्षेस हिंगोलीत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कापीमुक्त वातावरणात शिकले गेले. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद


हिंगोलीत दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस प्रारंभ पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षा

Hingoli Copy-free Examination |

हिंगोली (Hingoli Copy-free Examination) : दि. 16 जून 2026 पासून जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस सुरुवात झाली. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. जिल्ह्यात एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जिल्ह्यात 5 परीक्षा केंद्रांवर 983 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आज प्रथम भाषा मराठी या विषयाच्या पेपरला 5 केंद्रांवर 363 विद्यार्थ्यांपैकी 319 विद्यार्थी उपस्थित होते, तर 44 विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

बारावीच्या परीक्षेसाठी 3 परीक्षा केंद्रांवर 1544 विद्यार्थी प्रविष्ट असून आज इंग्रजी विषयाच्या पेपरला 1329 विद्यार्थ्यांपैकी 1250 विद्यार्थी उपस्थित राहिले. 79 विद्यार्थी अनुपस्थित होते.
कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. यासोबतच (Hingoli Copy-free Examination) दहावी व बारावीसाठी जिल्ह्यात 2 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य विषयांच्या पेपरसाठी वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांचे स्वतंत्र भरारी पथकही स्थापन करण्यात आले आहे. 

पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या कडक नियोजनामुळे परीक्षा शांततेत पार पडल्याने शिक्षण विभागाने समाधान व्यक्त केले आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी दिली.