Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात १ मे रोजी आंदोलन सुरू!

पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, गावातील ग्राम पंचायत कार्यालयावर २२ एप्रिल रोजी घागर आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले आहे.


पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात १ मे रोजी आंदोलन सुरू

Water Crisis |

मानोरा (Water Crisis) : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गादेगाव तांड्यावर पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, गावातील ग्राम पंचायत कार्यालयावर २२ एप्रिल रोजी घागर आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे १ मेपासून पंचायत समिती कार्यालयात ग्रामस्थांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केले आहे.

सुदाम भिका जाधव व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गादेगाव हे १४०० लोकवस्तीचे गाव असून येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन आणि जीवन प्राधिकरण २८ गावांतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तरीही गादेगाव तांड्यावर गटातटातील राजकारणामुळे लग्नसराईत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

यासंदर्भात २२ एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माजी सरपंच भारत आडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन केले होते. तरीही पाणीपुरवठा सुरळीत न होता नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.

यामुळे पाणीपुरवठा १ मे रोजीपर्यंत सुरू न झाल्याने प्रशासनाला काळे झेंडे दाखवून ग्राम पंचायत प्रशासनाचा निषेध करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

गावात तीन योजना आणि पाण्याची टाकी असतानाही सणासुदीला व उन्हाळ्यात लग्नसराईत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तांड्यातील महिलांना पाण्यासाठी डोंगर-दरी पालथी घालावी लागत असून, वाढत्या उन्हात ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.

पाण्यासाठी राजकारण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या गंभीर पाणी टंचाई समस्या न सुटल्याने आंदोलन पुकारले असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरूच होते.

Related to this topic: