Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अपघात अनोळखी मृतक

सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख पटली

Accident Unidentified Death: कळमनुरीतून रस्त्यावर अज्ञात वाहनेतील चोकीत ठार झालेल्या अनोळख्या मृताचा नातेवाईकांना सासुरवाडीमध्ये सोशल मीडिया मार्गाने ओळखले गेले.


सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख पटली

Accident Unidentified Death |

 

मयत नांदेड जिल्ह्यातील 

आखाडा बाळापूर (Accident Unidentified Death) : कळमनुरी तालुक्यातील महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम जागीच ठार झाला होता सदर मयताची ओळख चौवीस तासांच्या आत पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शना खाली सोशल मीडिया माध्यमातून पोलीसांनी पटवून आज मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २४ जून  अडीच वाजण्याच्या पुर्वी महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात कयाधू नदी पाण्यावरील पूलाच्या  समोर कळमनुरीकडे जाणारे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अनोळखी इसम जागीच ठार झाला होता.या अनोळखी इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिस निरीक्षक शरद मरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख राजेश घोंगडे,सागर वाढोणकर, पिराजी बेले पोलिस पथकाने परीसरात गावात माहिती देण्याबरोबरच वाटसफ ग्रुपमध्ये फोटो माहिती टाकली होती सदर वाटसफ ग्रूप फोटो माहिती मयत यांच्या सासुरवाडीतील नरवाडी येथील नातेवाईक यांनी बघून तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व ओळख पटली सदर मयत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथील धारबा बाबुराव खंदारे असल्याचे स्पष्ट झाले अस बिट प्रमुख राजेश घोंगडे  यांनी सांगितले.

सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख काही तासांतच पटली आहे.सोशल मिडिया फेसबुक,वाटसफ, इंस्टाग्राम माध्यमातून सदुपयोग घेतला तर तो उपयुक्त ठरतो.