Farmer Loan Waiver Scheme: शेतकरी संघटनाने आरोप दिले की कर्जदार व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना भेदभात झाला आहे. सारसकट मुकतीची मागणी केली गेल्यामुळे शेतकऱ्यांचा आंदोलन
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; सरसकट कर्जमाफीची मागणी
लातूर (Farmer Loan Waiver Scheme) : गेली दोन वर्षे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी निकष, अटी, शर्थी यांचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे. सरकारच्या मते कर्जमुक्तीमध्ये कमीत कमी शेतकरी डाव आहे, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला आहे.
याबाबत पटेल यांनी पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा रेटा वाढल्यानंतर सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्याचसोबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या विषयी संभ्रम तयार केला .कर्जदार शेतकरी व नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असा भेदभाव करून कर्जदारांना 2 लाख तर नियमित कर्ज फेड करणाऱ्याला 50 हजार असा भेदभाव केला. या अगोदर झालेल्या कर्जमाफीमध्ये असा भेदभाव झाल्याचे दिसत नाही. सरसकट कर्जमुक्ती याचा अर्थ असा होतो की, कर्जदार शेतकरी मग तो थकबाकीदार असो वा चालू बाकीदार असो, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत आहे. शेतकऱ्यांच्या प्रति चुकीचे धोरण राबवित आहे व तारीख पे तारीख, असे धोरण चालू आहे, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे. म्हणण्यापेक्षा मृग नक्षत्र संपला आहे. शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडला आहे. थकबाकीमुळे बँकाही त्याला कर्ज देत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला सरकारची कर्जमाफी सुद्धा त्याला लवकर मिळण्याची शक्यता नाही. सरकार तारीख पे तारीख लावून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. (Farmer Loan Waiver Scheme) सरकारने विनाअट सरसकट कर्जदार शेतकरी व नियमित कर्जफेड करणारा शेतकरी सर्वांना प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये तात्काळ देण्याची व्यवस्था करावी; अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.