Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कळमनुरी पोलिसांची कारवाई

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी कळमनुरी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.


वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कळमनुरी पोलिसांची कारवाई

Traffic Rules Violation |

दोन दिवसांत 57 प्रकरणे दाखल; 36 हजार 620 रुपयांचा दंड वसूल

कळमनुरी (Traffic Rules Violation) : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी कळमनुरी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

दिनांक 11 जून रोजी मोटार वाहन कायद्यानुसार 25 प्रकरणे दाखल करण्यात आली. या कारवाईत संबंधित वाहनचालकांकडून 15 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच, दिनांक 12 जून रोजी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध 32 प्रकरणे दाखल करण्यात आली असून 21 हजार 520 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

याशिवाय मोटार वाहन कायदा कलम 285 अन्वयेही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी वाहन चालविताना हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा, वाहनाची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी केले आहे.

 

Related to this topic: