Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्याची मागणी

सिद्धेश्वर धरणातून केळी पाझर तलावात पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्याची मागणी

Siddheshwar Dam |

जिल्हाधिकाऱ्यांसोबत संघर्ष समितीची सकारात्मक चर्चा

हिंगोली (Siddheshwar Dam) : सिद्धेश्वर धरणातून केळी पाझर तलावात पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी गरुड तसेच जिल्हा अभियंता विक्रम पत्की उपस्थित होते. समितीच्या प्रतिनिधींनी केळी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडल्यास सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, अशी ठाम भूमिका समितीने मांडली.

याशिवाय, तलावाच्या पाणी हक्कासंदर्भातील विविध मुद्द्यांवर तसेच भविष्यातील पाणी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

पाणी हक्काच्या प्रश्नावर प्रशासन सकारात्मक असून शेतकरी व नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीस केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीचे बी.डी. दादा बांगर, विलास आघाव, निवासपाटील सांगळे, सरपंच बालाजी सांगळे, अमोल सांगळे, एकनाथ नागरे, रामजी घुगे, दिनकर खिल्लारे, भास्कर आघाव, सोपान आघाव आणि शुभम सांगळे उपस्थित होते.

केळी पाझर तलावाच्या पाणी हक्कासाठी एकजुटीने व सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Related to this topic: