Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मुंबई

ठाणे येथे शिवशाही बसला भीषण आग; CETIS ब्रिज परिसरात खळबळ; १५ प्रवासी सुखरूप

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सेटीस (CETIS) ब्रिज परिसरात आज दुपारच्या सुमारास शिवशाही बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.


ठाणे येथे शिवशाही बसला भीषण आग cetis ब्रिज परिसरात खळबळ १५ प्रवासी सुखरूप

Shivshahi Bus Incident |

ठाणे (Shivshahi Bus Incident) : ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सेटीस (CETIS) ब्रिज परिसरात आज दुपारच्या सुमारास शिवशाही बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. उकाड्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होणार होती. बस स्थानकाजवळ आल्यानंतर अचानक बंद पडली. चालकाने परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच इंजिन व डिझेल टाकीजवळ आग भडकली. आग वेगाने पसरत गेल्याने बसने काही वेळातच पेट घेतला.

​​​​​​​

घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याच्या प्रचंड दाबाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्यामध्ये सहभाग घेतला. मात्र, आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी होती की शेवटी बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक व प्रवासी हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला होता. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related to this topic: