Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.


सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

Sengaon Storm Damage |

अनेक गावांतील सोलर पॅनल उडाले; पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सेनगाव (Sengaon Storm Damage) : तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सोलर पॅनलची संरचना उखडून पडली, तर काही ठिकाणी पॅनल हवेत उडून जाऊन मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील शेगाव, महाळसी, वाघजाळी, कहाकर, वरखेडा, आजेगाव, सिंगीनागा, ताकतोडा यांसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. सिंचनासाठी वीजेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने तसेच पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून सौर पंप आणि सोलर पॅनल उभारले होते. मात्र, वादळी वाऱ्याने या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे.

अनेक ठिकाणी सोलर पॅनल बसविण्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्टँड वाकल्याचे दिसून आले असून काही पॅनल फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही शेतांमध्ये पॅनल उडून शेजारील शेतांमध्ये पडल्याने इतर पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सौर ऊर्जा यंत्रणा निकामी झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नुकसानग्रस्त पॅनलची दुरुस्ती किंवा नवीन यंत्रणा उभारण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच संबंधित सोलर कंपन्यांनीही नुकसानभरपाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या सौर प्रकल्पांची पाहणी केली. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आधीच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related to this topic: