Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.


सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

Sengaon Storm Damage |

अनेक गावांतील सोलर पॅनल उडाले; पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सेनगाव (Sengaon Storm Damage) : तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सोलर पॅनलची संरचना उखडून पडली, तर काही ठिकाणी पॅनल हवेत उडून जाऊन मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील शेगाव, महाळसी, वाघजाळी, कहाकर, वरखेडा, आजेगाव, सिंगीनागा, ताकतोडा यांसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. सिंचनासाठी वीजेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने तसेच पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून सौर पंप आणि सोलर पॅनल उभारले होते. मात्र, वादळी वाऱ्याने या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे.

अनेक ठिकाणी सोलर पॅनल बसविण्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी स्टँड वाकल्याचे दिसून आले असून काही पॅनल फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही शेतांमध्ये पॅनल उडून शेजारील शेतांमध्ये पडल्याने इतर पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सौर ऊर्जा यंत्रणा निकामी झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नुकसानग्रस्त पॅनलची दुरुस्ती किंवा नवीन यंत्रणा उभारण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच संबंधित सोलर कंपन्यांनीही नुकसानभरपाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या सौर प्रकल्पांची पाहणी केली. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आधीच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related to this topic: