Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर

रायगड हादरला! आंबेनळी घाटात स्कॉर्पिओचा भीषण अपघात ; आठ जण जागीच ठार

सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.


रायगड हादरला आंबेनळी घाटात स्कॉर्पिओचा भीषण अपघात  आठ जण जागीच ठार

Scorpio Accident |

रायगड (Scorpio Accident) : सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओ तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर घाटातील भयावह दृश्य समोर आले असून संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसगाव येथील काही तरुण दापोली तालुक्यातील हर्णे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री मजामस्ती करून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील दाभिळ गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटले. घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावरून वाहन थेट खोल दरीत कोसळले.

अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ पूर्णपणे काळीकुट्ट आणि चिरडलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनास्थळी काही मृतदेह वाहनापासून अवघ्या पाच फुटांच्या अंतरावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते. घाटातील अंधार, खोल दरी आणि दुर्गम परिसर यामुळे बचावकार्य करताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सोमवारी सकाळपर्यंत काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25), सुहास जितेंद्र लोखंडे (20), अंश समीर चव्हाण (18), उत्कर्ष आनंद शिंगटे (21), अनिल अभिमन्यू शिंगटे (25) आणि नितीन किसन नायकोंडे (35) यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती साताऱ्यात पोहोचताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: