Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ

जांब मार्ग वृक्षतोड

सावरखेड–पाचरण जांब मार्गावर वृक्षतोड, चोरी व जंगलातील आगीचे संकट

Jamb Marg tree felling: सावरखेड ते पाचरण जांब मार्गावरील वृक्षतोड, वृक्ष चोरी व जंगलातील आगीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडला आहे. स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.


सावरखेड–पाचरण जांब मार्गावर वृक्षतोड चोरी व जंगलातील आगीचे संकट

Jamb Marg tree felling |

नाकेबंदीची नागरिकांची मागणी

पातूर (Jamb Marg tree felling) : सावरखेड ते पाचरण जांब या ग्रामीण मार्गावरील जंगल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व वृक्ष चोरी सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडील काही दिवसांत या परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत अनेक वनस्पती, झाडे तसेच वन्यजीव व पक्ष्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलातील जैवविविधतेवर याचा गंभीर परिणाम होत असून भविष्यात पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस काही संशयास्पद वाहनांची ये-जा वाढली असून या वाहनांद्वारे बेकायदेशीरपणे लाकूड वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या मार्गावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. सावरखेड येथून जंगलात प्रवेश करताना एक नाका उभारण्यात यावा, तसेच पाचरण जांब बाजूने येणाऱ्या मार्गावरही स्वतंत्र नाकेबंदी करण्यात यावी. या  (Jamb Marg tree felling) दोन्ही ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस कडक तपासणी करूनच वाहनांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.

तसेच, जंगलातील आग नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करणे, गस्त वाढवणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Related to this topic: