Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Savardoh Bridge

सावरडोह पुलाचा बोजवारा; वळण रस्ता वाहून गेल्याने १० ते १२ गावांचा संपर्क तुटला

बांधकाम विभागाची निष्क्रियता आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाची किंमत आता सावरडोह परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोजावी लागत आहे.


सावरडोह पुलाचा बोजवारा वळण रस्ता वाहून गेल्याने १० ते १२ गावांचा संपर्क तुटला

Savardoh Bridge |

बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा फटका; शेतकऱ्यांना ३० किमीचा फेरा

कारंजा (Savardoh Bridge) : बांधकाम विभागाची निष्क्रियता आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाची किंमत आता सावरडोह परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना मोजावी लागत आहे. रखडलेल्या पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेल्याने हजारो नागरिकांचा कारंजा शहराशी संपर्क तुटला आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला असून, एका प्रवासासाठी तब्बल ३० किलोमीटरचा फेरा मारण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

कारंजा-सावरडोह मार्गावरील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता काल झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

सावरडोह परिसरातील गावांचा मुख्य संपर्क कारंजा शहराशी असल्याने शिक्षण, आरोग्य सेवा, बाजारपेठ आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, वाढलेल्या अंतरामुळे त्यांचा खर्चही वाढला आहे.

सध्या पेरणीची लगबग सुरू असून हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणारे साहित्य वेळेत शेतात पोहोचले नाही, तर संपूर्ण वर्षाचे नियोजन कोलमडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र एका पुलासाठी आणि पर्यायी रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत. पुलाचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related to this topic: