Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रोहणा येथील उपसरपंचावरील अविश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील

अविश्वास ठरावाची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर निकषांनुसार पार पडली नसल्याचा दावा अपीलमध्ये करण्यात आला असून संबंधित ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.


रोहणा येथील उपसरपंचावरील अविश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील

Rohana Gram Panchayat |

निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष

मानोरा (Rohana Gram Panchayat) : पंचायत समिती मानोरा अंतर्गत येणाऱ्या रोहणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र राऊत यांच्याविरोधात मंजूर करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला आव्हान देत जिल्हाधिकारी, वाशिम कार्यालयात अपील दाखल करण्यात आले आहे. अविश्वास ठरावाची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर निकषांनुसार पार पडली नसल्याचा दावा अपीलमध्ये करण्यात आला असून संबंधित ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रोहणा ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी उपसरपंचांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर नियमानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आणि त्या सभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित करण्यात आले.

मात्र, सभेची नोटीस देण्यापासून ते मतदान प्रक्रियेपर्यंत विविध टप्प्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप उपसरपंच रविंद्र राऊत यांनी केला आहे. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या अपीलमध्ये अविश्वास ठरावाची प्रक्रिया, सभेचे इतिवृत्त, उपस्थिती नोंद, मतदानाची पद्धत तसेच संबंधित प्रशासकीय आदेशांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, चौकशीत कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्यास अविश्वास ठराव रद्द करून न्याय देण्यात यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे रोहणा ग्रामपंचायतीच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून आपापल्या भूमिकांचे समर्थन केले जात असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयाकडे ग्रामस्थांसह स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने अपील स्वीकारले असून संबंधित पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अविश्वास ठराव कायम राहणार की त्यास स्थगिती मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related to this topic: