Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

रस्ता सुरक्षा अभियान

“मोबाईल नको, सुरक्षित प्रवास हवो&quot, रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

Road Safety Campaign: हिंगोलीत वाढत्या अपघातांच्या नियंत्रणासाठी पोलीस व वाहतूक शाखेने विशेष जनजागृती अभियान सुरू केला. मोबाईल वापरणे व वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन.


“मोबाईल नको सुरक्षित प्रवास हवोquot रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

Road Safety Campaign |

हिंगोली जिल्हा पोलिसांचे आवाहन

हिंगोली (Road Safety Campaign) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन हिंगोली जिल्हा पोलीस व शहर वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान तीव्र केले आहे. “वाहन चालवितांना मोबाईल फोन वापरू नका” आणि “Drive Slow... Stay Safe” या मुख्य संदेशासह जिल्हाभर फलक, पोस्टर आणि शाळा- महाविद्यालयांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 “तुमचा मोबाईल कुठेही जाणार नाही... पण वाहन मात्र नक्की जाईल” या घोषवाक्यास पोलिसांनी निदर्शनास आणले की एका सेकंदाचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. वाहन चालवताना कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होते व अपघाताची शक्यता ४ पट वाढते. “Obey the sign or pay the fine. Drive within the speed limit!” असा इशारा देत वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले की वेगमर्यादा पाळणे हीच स्वतःची व इतरांची सुरक्षा आहे. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व शाळांजवळ वेग कमी ठेवणे बंधनकारक आहे.

आपत्कालीन... रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करा” असे आवाहन करत पोलिसांनी सांगितले की अँम्ब्युलन्सचा सायरन ऐकताच डावीकडे वाहन घेऊन मार्ग मोकळा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. एक मिनिटाचा उशीरही रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो.  “सड़क पर चलते समय, फोन इस्तेमाल ना करें. सतर्क रहें, सुरक्षित रहें” या संदेशातून पादचाऱ्यांनीही रस्ता ओलांडताना मोबाईल न वापरण्याचे व झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी सांगितले की, “Road safety is everyone's responsibility. Stay focused, be aware of the surroundings and follow traffic rules.” गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ६०% अपघातांचे कारण मोबाईलचा वापर व अतिवेग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाईसोबतच जनजागृतीवर भर दिला जात आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार (Road Safety Campaign) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास ₹५,००० पर्यंत दंड व परवाना निलंबनाची कारवाई होऊ शकते. अतिवेगासाठी ₹२,००० पर्यंत दंड आकारला जातो. रुग्णवाहिकेला मार्ग न दिल्यास ₹१०,००० दंड व ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. “लवकर निघा... हळू चालवा... सुरक्षित रहा” हा मंत्र लक्षात ठेवा. तुमची एक चूक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा व इतरांनाही करायला सांगा. 

हिंगोली पोलीस दलाने सर्व नागरिक, शाळा, सामाजिक संस्था व वाहनचालक संघटनांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Related to this topic: