Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

Rainfall Deficit

कोरपना तालुक्यात पावसाची दडी; कोमेजती पिके पाहून बळीराजा चिंतेत

तालुक्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या आटोपल्या.


कोरपना तालुक्यात पावसाची दडी कोमेजती पिके पाहून बळीराजा चिंतेत

Rainfall Deficit |

कोरपना : तालुक्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या आटोपल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील खरीप पिके आता करपण्याच्या मार्गावर आहेत. कडक ऊन आणि पावसाचा खंड यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

तालुक्यात कपाशी, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. अंकुरलेली पिके जगवण्यासाठी सध्या पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र, जुलै महिना उजाडला तरीही दमदार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत जमीन कोरडी पडल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत.

अशाच प्रकारे आणखी काही दिवस पाऊस न आल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर दुबार पेरणीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने, आधीच कर्जाच्या खाईत असलेला कोरपना तालुक्यातील शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाने त्वरित हजेरी न लावल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी चिंता स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Related to this topic: