Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > पुणे

Pimpri Chinchwad Building Collapse

पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसात दोन मजली इमारत कोसळली; 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मोठी दुर्घटना घडली आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसात दोन मजली इमारत कोसळली 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती बचावकार्य युद्धपातळीवर

Pimpri Chinchwad Building Collapse |

मोशी कचरा डेपोजवळील दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, आपत्ती निवारण पथक आणि पोलीस घटनास्थळी; परिसरात भीतीचे वातावरण

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला असतानाच मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत अचानक कोसळली. घटनेच्या वेळी इमारतीमध्ये नागरिक उपस्थित असल्याने सुमारे 14 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे बचावमोहीम सुरू केली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शहरात गेल्या काही तासांपासून सतत पाऊस सुरू असून या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत ही इमारत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सध्या बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून स्थानिक नागरिकही बचावकार्यात प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने विविध ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला असून वारीच्या पालखी मार्गातही बदल करण्यात आला आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांना वेळोवेळी हवामान आणि पावसाबाबतचे इशारे दिले जात आहेत.

दरम्यान, दुपारच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू असताना ही इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच जखमींबाबतही प्रशासनाकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसून बचावकार्य सुरू असल्याने पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Related to this topic: