Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी शॉर्टसर्किट आग

परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire: परभणी तालुक्यातील वांगी येथील एका शिवारातील आखाड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमुळे जळलेल्या ठिंगांमुळे आखाड्याला आग लागली.


परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire |

परभणी (Parbhani short circuit fire) : तालुक्यातील वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्याला आग लागली सोसाट्याचा वारा सुरू असताना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग झाले.त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतातील आखाड्याला आग लागली असल्याची माहिती अशोक गंगाधर गलांडे यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना दिली आहे.

परभणी तालुक्यातील वांगी येथील शिवारात विश्वनाथ काशिनाथ शिंदे यांचा अखाडा असुन यांची शेती सध्या अशोक गंगाधर गलांडे यांनी बटईने केली आहे.वार शनिवार 30 मे रोजी रात्री अंदाजे बाराच्या सुमारास महावितरणच्या तारांमधे शॉर्टसर्किट होऊन आखाड्याजवळ असलेल्या (Parbhani short circuit fire) कडब्याच्या गंजीला आग लागुन सुसाट वाऱ्याच्या वेगाने आखाड्याला आग लागली या आगीचा धूर व ज्वाला दिसताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अशोक गलांडे यांना माहिती दिली असता घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी असलेल्या शेतकऱ्यांनी आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रौद्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही क्षणांत संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या (Parbhani short circuit fire) आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीच्या लोळाने आखाड्यातील खरीप पेरणी साठी आणलेले खत बियाणे, ज्वारी 15 कट्टे, हरबरा 40 कट्टे जनावरांचेखाद्य,कडबा.गुळी,फिंकलर, नौजल,पाईप,वायर बंडल,पेंड,फवारणी यंत्र, पत्रांचे शेड, ताडपत्री,व इतर साहित्य जळाले असल्याची माहिती अशोक गलांडे यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना सांगितले आहे.प्रशासनाकडू नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related to this topic: