Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी दुचाकी अपघात

परभणीत आयशरची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

Parbhani Bike Accident: नांदेड महामार्गावरील अपघातात आयशरचा दुचाकी धडकून शेख सत्तार यांचा गंभीर जखमीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटना नोंद करण्यात आली.


परभणीत आयशरची दुचाकीला धडक एकाचा जागीच मृत्यू

Parbhani Bike Accident |

 

पूर्णा - नांदेड महामार्गावर गौर शिवारात अपघात; मयत परभणी येथील रहिवाशी

परभणी/ पूर्णा (Parbhani Bike Accident) : पूर्णा - नांदेड महामार्गावर बुधवार ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आयशर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. मयत इसम परभणीतील आनंद नगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे.

या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, शेख सत्तार शेख जुल्फेकर वय ५१ वर्ष रा.आनंद नगर परभणी ह.मु.क्रांती नगर पूर्णा असे मयताचे नाव आहे. शेख सत्तार हे बुधवारी दुपारी आपल्या एम.एच.२२ ए.जे. ०५१६ या दुचाकीने पूर्णा येथून चुडाव्याच्या दिशेने जात होते. गौर शिवारात नोव्हेल्टी बियर बार समोर भरधाव वेगावातील एम.एच.२६ सी.एच. ९१९७ या क्रमांकाच्या आयशरने  दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने शेख सत्तार यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्या नंतर सपोनी सुशांत किनगे, पोलीस अंमलदार महादेव आगळे, विलास मिटके, गौतम ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात ग्रस्त वाहने ताब्यात घेतली. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठवीला. चुडावा पोलीसात नोंद करण्यात आली आहे. 

अपघातांचा ब्लॅक स्पॉट
पूर्णा - नांदेड महामार्गावर नेहमीच अपघात होत आहेत. हा महामार्ग अपघाताचे ब्लॅक स्पॉट ठरत आहेत. या रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे.

Related to this topic: