Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी शेतकरी उपोषण

परभणीत गोदाकाठ साखर कारखान्याविरोधातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे...!

Parbhani Farmers' Hunger Strike: गोदाकाठ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी शनिवार १० जुलैला उपोषण केले. ते आश्वासन मागत असून ऊस बिलांची रकम उरवलेल्या शेतकारांना आठवड्यात देण्याचा निर्णय घेतला.


परभणीत गोदाकाठ साखर कारखान्याविरोधातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे

 

अर्ध्या शेतकर्‍यांच्या खात्यावर ऊस बिल जमा उर्वरित रक्कम आठवडाभरात देण्याचे आश्वासन

परभणी (Parbhani Farmers' Hunger Strike) : पाथरी तालुक्यातील गोदाकाठ ऑर्गानिक साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले कासापुरी सर्कलमधील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे बेमुदत उपोषण शनिवार १० जुलै रोजी मागे घेण्यात आले.उपोषणादरम्यान कारखान्याच्या संचालकांच्या वतीने प्रशासनास लेखी आश्वासन देण्यात आले.

त्यानुसार, ऊस पुरवठा केलेल्या सुमारे अर्ध्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थकीत ऊस बिलाची रक्कम वर्ग करण्यात आली असून उर्वरित शेतकर्‍यांची देयके पुढील आठवडाभरात त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील असे सांगण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलक शेतकर्‍यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंदोलकांना नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.