Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ओबीसी आरक्षण न मिळाल्याने पोतरा ग्रामसभेत गोंधळ

कळमनुरी तालुक्यातील पोतरा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला.


ओबीसी आरक्षण न मिळाल्याने पोतरा ग्रामसभेत गोंधळ

OBC Reservation |

कळमनुरी  (OBC Reservation) : कळमनुरी तालुक्यातील पोतरा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. यामुळे ग्रामसभा गोंधळात पार पडली असून ग्रामस्थांनी इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या करण्यासही नकार दिला.

आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ जून रोजी पोतरा ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य आरक्षणासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी व्ही. एन. किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला ग्राम महसूल अधिकारी दिनेश राऊत आणि ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. अंभोरे उपस्थित होते.

सभेदरम्यान अध्यासी अधिकाऱ्यांनी २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार नऊ सदस्यांपैकी अनुसूचित जातीसाठी तीन आणि अनुसूचित जमातीसाठी दोन जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामुळे आरक्षणाचा ५० टक्के कोटा पूर्ण झाल्याने ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण उपलब्ध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या निर्णयाला उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडत ग्रामस्थांनी सभेतच विरोध दर्शविला. आरक्षण प्रक्रियेबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत अनेक ग्रामस्थांनी सभा पुढे चालू देण्यास विरोध केला.

यावेळी काही ग्रामस्थांनी, "जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होऊ देणार नाही," अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. परिणामी वातावरण तणावपूर्ण बनले आणि ग्रामसभा प्रभावीपणे पार पडू शकली नाही.

दरम्यान, ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेच्या इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या करण्यासही नकार दिला. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रसंगी पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, शंकर मुलगीर, गणेश मुलगीर, सरपंच रघुनाथ गुहाडे, माजी सरपंच गुणाजी फोपसे, रामराव मुलगीर, शंकर रणवीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: