Breaking News
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nomination Filing |

वर्धा (Nomination Filing) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आगामी निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचा दृढ विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष शिवा राव, विनायक बांगडे, सुभाष गौर, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीत एकजुटीने लढत देण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ वाढविण्याचे आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे निवडणूक वातावरणाला अधिक रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related to this topic: