Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मुंबई

BKC मध्ये ‘नो कार फ्रायडे’ उपक्रमाची सुरुवात; १२ जूनपासून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


bkc मध्ये ‘नो कार फ्रायडे’ उपक्रमाची सुरुवात १२ जूनपासून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य

No Car Friday |

MMRDAचा महत्त्वपूर्ण निर्णय; दर शुक्रवारी ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ म्हणून पाळला जाणार, सुमारे २ लाख कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

मुंबई (No Car Friday) : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या प्रमुख व्यावसायिक केंद्रात दर शुक्रवारी ‘नो कार फ्रायडे’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १२ जूनपासून याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होणार आहे. हा दिवस ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ म्हणूनही पाळला जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत BKC परिसरात काम करणाऱ्या सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाहने किंवा कॅबऐवजी लोकल ट्रेन, मेट्रो आणि बससारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार महिने या उपक्रमाचे बारकाईने निरीक्षण केले जाणार असून, दर आठवड्याला येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.

MMRDAच्या माहितीनुसार, बीकेसी परिसरात येणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी ५२ टक्के लोक अद्याप खासगी कार, टॅक्सी किंवा रिक्षांवर अवलंबून आहेत. याउलट केवळ २५ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास दोन तासांपेक्षा अधिक वेळ घेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

बीकेसी हे देशातील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे मोठ्या कंपन्या तसेच सरकारी कार्यालये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यामुळे दररोज सुमारे दोन लाख कर्मचारी या भागात ये-जा करतात. याशिवाय अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांची संख्याही लक्षणीय आहे.

दरम्यान, या भागात सार्वजनिक वाहतुकीचे जाळे उपलब्ध असले तरी त्याचा पुरेसा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रो लाइन ३ (अक्वा लाईन) थेट BKC ला जोडते, तर वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांपासून फीडर सेवांच्या माध्यमातून कार्यालयांपर्यंत पोहोचता येते. बेस्ट उपक्रमांतर्गत या मार्गावर दररोज १०० हून अधिक बस चालवल्या जात असून, सुमारे २५,००० ते ३०,००० प्रवासी त्यांचा वापर करतात.

तथापि, ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ म्हणजेच स्टेशन किंवा थांब्यापासून अंतिम गंतव्यापर्यंतचा प्रवास हा सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर BKC परिसरात ‘नो कार फ्रायडे’ उपक्रम यशस्वी करण्यावर MMRDAचा भर राहणार आहे.

Related to this topic: