Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Nilgai Rescue

हिंगोलीत वनविभागाची तत्परता; शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली.


हिंगोलीत वनविभागाची तत्परता शेततळ्यात अडकलेल्या चार निलगायांना जीवदान

Nilgai Rescue |

हिंगोली (Nilgai Rescue) : हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या चार निलगाय शेततळ्यात पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवून सर्व निलगायांना सुरक्षित बाहेर काढत त्यांना जीवदान दिले.

विभागीय वनाधिकारी डॉ. राजेंद्र नाळे आणि उपवनसंरक्षक माने यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनमजूर संग्राम भालेराव, राऊत तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि प्राणीमित्रांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर सर्व निलगायांना शेततळ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

प्रथमोपचार केल्यानंतर सर्व निलगायांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाच्या या तत्पर कारवाईमुळे चार मुक्या जीवांना जीवदान मिळाले असून, या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेततळ्यांकडे येत असल्याने अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळ्यांभोवती संरक्षक जाळी किंवा काटेरी कुंपण उभारावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Related to this topic: