Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण दडपता कामा नये!


नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण दडपता कामा नये

NEET Exam Scam |

अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा इशारा

लातूर (NEET Exam Scam) : देशभरातील तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थी नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे प्रभावित झाले आहेत. देशभरात धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पुणे सगळीकडे नीटच्या गद्दारांचे धागेदोरे मिळत आहेत. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेपरफुटी प्रकरण दडपता कामा नये, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

लातूर पॅटर्नला हादरवणारी बाब म्हणजे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय इतर क्लासेसवाल्यांची कसून चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे. परिस्थिती गांभीर्याने हाताळली नाही तर राज्यभर हिंसक पडसाद उमटू शकतात, असा इशाराही नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

नीट 2026 परीक्षेत एखाद्या क्लासेसवाल्याचे ४२ प्रश्न जसेच्या तसे उमटतात. याबाबत आठ तास सीबीआय चौकशी झाली आहे. गेस पेपरचा गुंता कसा झाला, याबाबत सीबीआय चौकशीनंतरही खुलासा होऊ शकत नाही. दुसरीकडे हे प्रकरण गुंडाळल्याचे संकेत काही लोकांना हाताशी धरून सोशल मीडियातून फिरविले जात आहेत. यामुळे सीबीआय चौकशीकडेही शंकेने पाहिले जात आहे, असा आरोप जावळे पाटील यांनी केला आहे.

नीट पेपरफुटीमुळे पिढीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केवळ पंधराशे रुपये परीक्षा फी माफ करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल जावळे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भविष्यात असे शैक्षणिक गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने कडक पावले उचलणे आवश्यक आहे. नॉमिनल प्रवेश, अमर्याद प्रवेश या सर्व प्रकारांवर निर्बंध आणले पाहिजेत. पी. टी. ए. अर्थात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशननेही यावर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. सर्व क्लासेस संचालकांची कमाई किती याची सविस्तर माहिती जनतेसमोर आणली पाहिजे. कोचिंगच्या शाखा, शिकवणी आणि शिक्षकांची माहितीही सार्वजनिक झाली पाहिजे.

सरकारने लवकरच कडक पावले उचलावीत, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना कोटीची नुकसान भरपाई द्या!

एनटीए समिती बरखास्त करावी. नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी. दोषी प्राध्यापकांच्या पदव्या रद्द करून त्यांच्या क्लासेसवर कायमस्वरूपी निर्बंध घालावेत. नॉमिनल अॅडमिशन व अमर्याद प्रवेश यावर निर्बंध घालावेत. सर्व क्लास चालक, शिक्षक व प्राध्यापक यांच्या कमाई व मिळकतीची सखोल चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या छावा संघटनेने केल्या आहेत.

Related to this topic: