Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या


जंगलात भटकू नका मुख्य प्रवाहात या

Naxal Surrender |

आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

गडचिरोली (Naxal Surrender) : जंगलात भटकंती आणि हिंसेच्या मार्गातून काहीही साध्य होत नाही, हे स्वतःच्या २२ वर्षातील अनुभवातून स्पष्ट झाल्याने ‘हिंसेचा मार्ग सोडा आणि संविधानाचा स्वीकार करून मुख्य प्रवाहात या,’ असे भावनिक आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या माजी सहकार्‍यांना केले आहे.

संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या पती गिरिधर तुमरेती व इतर साथीदारांसह दि. २२ जून २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ २००२ पासून  नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या संगीता यांनी या काळात जंगलातील कठीण जीवन अनुभवले; मात्र हा मार्ग चुकीचा असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंसेचा त्याग करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, ‘नक्षल चळवळीत राहून कोणताही सकारात्मक बदल घडत नाही. उलट स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य अंधारात जाते. त्यामुळे मी संविधानिक मार्ग स्वीकारला आहे.
आपल्या उर्वरित सहकार्‍यांना उद्देशून त्या म्हणाल्या, ‘उगीच जंगलामध्ये भटकू नका. तुमचे आई-वडील, कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा व सामान्य जीवन जगा असाही संदेश त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून दिला आहे.

शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या - आ. धर्मरावबाबा आत्राम

दरम्यान अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील उर्वरित नक्षलवादी यांनी आत्मसमर्पण करून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्य शासनाकडून आत्मसमर्पण करणार्‍यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी विविध पुनर्वसन योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आदी ओळख पत्र व सेवांच्या नोंदणीसह आर्थिक मदत, निवास व्यवस्था, शिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन सन्मानाने नवे आयुष्य सुरू करता येते असेही आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

Related to this topic: