Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

National Mourning

माहूरात सामाजिक वनीकरण विभागाचा उद्घाटन सोहळा; राष्ट्रीय दुखवट्याला हरताळ!

कतारचे माजी अमीर यांच्या निधनानिमित्त केंद्र शासनाने दि. १३ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.


माहूरात सामाजिक वनीकरण विभागाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय दुखवट्याला हरताळ

माहूर (नांदेड) : कतारचे माजी अमीर यांच्या निधनानिमित्त केंद्र शासनाने दि. १३ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असताना, माहूर शहरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अटल आनंदवन घनवन (मियावाकी) प्रकल्पाच्या उद्घाटनाचा शासकीय कार्यक्रम मोठ्या थाटात हार-तुरे आणि भाषणांसह साजरा करण्यात आल्याने सामाजिक वनीकरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधितांना राष्ट्रीय दुखवट्याचे गांभीर्य नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

गृह मंत्रालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार, राष्ट्रीय दुखवट्याच्या दिवशी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविणे आणि कोणतेही शासकीय मनोरंजन अथवा औपचारिक कार्यक्रम आयोजित न करणे अपेक्षित असते. असे असतानाही माहूर शहरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह परिसरात सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षलागवड प्रकल्पाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात केला.

किनवट सामाजिक वनीकरण विभागामार्फत अडीच एकर क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, ग्राम महसूल अधिकारी, वनरक्षक, स्थानिक मान्यवर, पत्रकार तसेच अन्य अशासकीय नागरिक उपस्थित होते.

मात्र, राष्ट्रीय दुखवट्याच्या दिवशी अशा स्वरूपाचा शासकीय उद्घाटन सोहळा घेता येतो का? संबंधित अधिकाऱ्यांना गृह मंत्रालयाच्या आदेशांची माहिती नव्हती का? की केंद्र सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राष्ट्रीय दुखवट्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांसाठी बंधनकारक असताना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने एका पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व विभागप्रमुखांना दिली असतानाही माहूरातील या कार्यक्रमामुळे सामाजिक वनीकरण प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: