हिंगोली (Narmada Parikrama) : चैत्र मासात एक दिवसीय उत्तरवाहिनी परिक्रमाचे खुप महत्व आहे. नर्मदा पुराण मधे सांगितल्या प्रमाणे ज्यांना पूर्ण 3000 km ची नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही. त्यांच्या करीता चैत्र मासातील २१ किलोमीटर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्याने पूर्ण परिक्रमाचे फळ आहे. त्या प्रमाणे भाविकांच्या प्रतिसादाने श्री गणेश पहिनकर हिंगोली यांच्या नियोजनात दि. २१ मार्च रोजी हिंगोली येथून भाविक रवाना होऊन २३ मार्च रोजी नर्मदा परिक्रमा पूर्ण करुन भाविक सुखरूप घरी पोहचले. उत्तवाहिनी नर्मदा परिक्रमात सहभागी श्री.प्रदीपराव देशपांडे लोहगावकर, सौ.प्रतीक्षा प्रदीप देशपांडे हिंगोली, मुक्ताताई देशमुख छत्रपती संभाजी, नगर, श्री.शिवाजी शामराव वैद्य, सौ उर्मिला शिवाजी वैद्य, परभणी श्री चंद्रकांत देशपांडे, परभणी,सौ सुनीता चंद्रकांत देशपांडे, परभणी.श्री नरेंद्र शुक्ल, सौ रेखा नरेंद्र शुक्ल परभणी, श्री नरेंद्र शेषराव वैद्य, सौ.सुमन नरेंद्र वैद्य परभणी,डॉ राहुल राळेगावकर हिंगोली, श्री रवींद्र देशपांडे,रेणुका रवींद्र देशपांडे हिंगोली, श्री राहुल मांडाखळीकर,पद्मिनी पितांबरे सायली पितांबरे छ.संभाजी नगर आदींचा यामध्ये सहभाग होता.