Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Narayana E-Techno School

नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी

हिंगोली शहरातील नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारण्यात आलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड तातडीने वसूल करावा.


नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी

समाजसेवक मुनीर खान पठाण यांचे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना निवेदन

हिंगोली : हिंगोली शहरातील नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारण्यात आलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड तातडीने वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी समाजसेवक मुनीर खान पठाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना निवेदन सादर केले आहे.

या संदर्भात आरोग्यदूत तथा समाजसेवक मुनीर खान पठाण यांनी १६ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सन २०२४ मध्ये हिंगोली शहरात नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळा सुरू करण्यात आली. संबंधित शाळेकडे यू-डायस (U-DISE) क्रमांक नसल्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.

सतत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली होती. त्यानंतरही शाळा सुरूच ठेवण्यात आल्याने १९ ऑगस्ट रोजी शाळेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला सील ठोकले होते.

मात्र, त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी शिक्षण विभागाने संबंधित शाळेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल न करताच मान्यता दिली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

दंडाची रक्कम वसूल न करता शाळेला मान्यता कशी देण्यात आली, याची चौकशी करून ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी समाजसेवक मुनीर खान पठाण यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Related to this topic: