Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा इशारा; शनिवारला शाळांना सुट्टी

जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांना शनिवार 18 एप्रिल रोजीची  सुट्टी जाहीर केली आहे.


नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा इशारा शनिवारला शाळांना सुट्टी

Nagpur Heatwave |

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य

नागपूर (Nagpur Heatwave) : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांना शनिवार 18 एप्रिल रोजीची  सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकारांचा वापर करत हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा हद्दीतील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांना दिनांक 18 एप्रिल  (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, संबंधित सर्व शासकीय व निमशासकीय विभागांना या आदेशाची माहिती देण्यात आली असून, आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Related to this topic: