Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा पाऊस

मोठ्या पावसाअभावी नदी-नाले कोरडेच; रिमझिम पावसाने पिकांना दिलासा!

Manora Rain:


मोठ्या पावसाअभावी नदी-नाले कोरडेच रिमझिम पावसाने पिकांना दिलासा

Manora Rain |

 

सलग पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईची भिती

मानोरा (Manora Rain) : मानोरा तालुक्यात पावसाळ्याला जवळपास दोन महिने पूर्ण होऊनही समाधानकारक व सलग पाऊस झालेला नाही. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरींमुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी नदी-नाले, ओढे, तलाव आणि बोअरवेलमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  

 जून अखेरीस झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस, मूग यांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने जवळपास 15 दिवस दडी मारल्याने पिके करपण्याची वेळ आली होती. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्या पावसामुळे पिकांची वाढ पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  

 मात्र नदी-नाले, ओढे आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. भूजल पातळी वाढलेली नसल्याने विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची आवकही अत्यल्प आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. दररोज आभाळ भरून येत असले तरी रिमझिम पावसाशिवाय दमदार पाऊस होत नसल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत होत आहे. खतांचा वापर, तणनाशकांची फवारणी आणि इतर शेतीकामांवरही त्याचा परिणाम होत आहे.  

येत्या काही दिवसात मुसळधार (Manora Rain) व सलग पाऊस झाला नाही, तर खरीपाबरोबरच रब्बी हंगामालाही फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.  
प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे आणि पाणी बचतीचे नियोजन तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.