Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

विश्रोळी पूर्णा प्रकल्प

विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची 2 दरवाजे उघडली..

Vishroli Purna Project: विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढ, प्रकल्पातून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रतिवसेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे.


विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची 2 दरवाजे उघडली

Vishroli Purna Project |

 

2 दरवाजे दहा सेंटीमीटर उघडून नदी पात्रात 15.50 प्रति सेकंद विसर्ग सुरू 

चांदूर बाजार (Vishroli Purna Project) : मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून धरणामध्ये ७१.१९ टक्के जलसाठा झाला असल्याने ८ जुलै ला सायंकाळी ४ वाजता प्रकल्पाची  २ दारे १० सेमीने उघडण्यात आली असून प्रकल्पातून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रतिवसेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील (Vishroli Purna Project) पुर्णा मध्यम प्रकल्पात दिनांक ८जुलै रोजी  सकाळी ०७:०० वाजता जलाशय पातळी ४४९.५८ मी., उपयुक्त पाणी साठा  २५.१८ द.ल.घ.मी. व टक्केवारी ७१.१९% ईतका पाणीसाठा झालेला असल्याने त्या अनुषंगाने  ८जुलै रोजी ४.०० वाजता प्रकल्पातुन नदी पात्रात १५.५० घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे पूर्णा प्रकल्प उपअभियंता यांनी दिलेल्या सूचनेवरून  सर्व यंत्रणांनी नोंद घेण्यात यावी व त्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे कळविण्यात आले आहे.

प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तालुक्यातील (Vishroli Purna Project) पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कुणीही उतरू नये, जनावरे सुरक्षित ठिकाणी न्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे असे आवाहन पुर्णा मध्यम प्रकल्प उपअभियंता सागर अलटकर यांनी केले आहे.