Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > जालना

Maratha Reservation,

कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना दिला थेट इशारा

राज्यात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.


कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल मुख्यमंत्र्यांना दिला थेट इशारा

Maratha Reservation, |

आंतरवलीत पत्रकार परिषदेत गंभीर आरोप; राजकारणासाठी मराठा समाजाचा छळ होत असल्याचा दावा, सरकारवर निशाणा

राज्यात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंतरवली येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने या विषयावर गैरसमज निर्माण केला आहे. सरकारकडून राजकीय हेतूने मराठा समाजाचा छळ केला जात असून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी दावा केला की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. संबंधित पत्र अस्तित्वात असल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले की, एका आडनावाचे हजारो लोक असताना राजकीय द्वेषातून सर्वांवर कारवाई करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांना फोन करून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राजकारणासाठी अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी बावनकुळे यांचाही उल्लेख केला. मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करण्याचे अधिकार जर त्यांना दिले, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने मराठा समाजाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ नये, असेही ते म्हणाले.

याशिवाय, मराठा समाजाच्या युवकांचे नुकसान होईल असे निर्णय सरकारने टाळावेत, असे आवाहन करत आपल्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Related to this topic: