Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

अतिवृष्टी अनुदान घोटाळा

मौजा भूलीच्या २०२३ अतिवृष्टी अनुदानात घोटाळा!

Rainfall Fund Scam: मौजा भुली येथील सन २०२३ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत देवानंद शिंदे व राजेश राठोड यांनी तहसीलदार स्मरणपत्र


मौजा भूलीच्या २०२३ अतिवृष्टी अनुदानात घोटाळा   

Rainfall Fund Scam |

 

दोषींवर कारवाई करून पात्र नागरिकांना अनुदान द्यावे!

मानोरा (Rainfall Fund Scam) : तालुक्यातील मौजा भुली येथील सन २०२३ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत देवानंद शिंदे व राजेश राठोड यांनी तहसीलदार यांना १ ऑगस्ट रोजी स्मरणपत्र दिले आहे. तसेच येत्या १५ ऑगस्टपर्यंत वंचित नागरिकांना न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
     
जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या अहवालात ग्रामस्तरीय समिती दोषी असल्याचे नमूद असतानाही गेली ३ वर्षे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.  उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या तक्रारीनंतरही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे (Rainfall Fund Scam) दोषी ग्रामस्तरीय समिती सदस्य, सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच पात्र लाभार्थ्यांना तातडीने अतिवृष्टी अनुदानाचे वाटप करावे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेणार, याकडे भुली येथील शेकडो आपदग्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.