Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

सुनील केदार

महागाई-बेरोजगारीचा फटका; खतदर वाढले, पिकांना भाव नाही: सुनील केदार

Sunil Kedar: धापेवाडा येथे सहकार भारत गॅस एजन्सीचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन. माजी मंत्री सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.


महागाई-बेरोजगारीचा फटका खतदर वाढले पिकांना भाव नाही  सुनील केदार

Sunil Kedar |

 

धापेवाडा येथे ‘सहकार भारत गॅस’ एजन्सीचे  उद्घाटन तसेच शेतकरी मेळाव्या प्रसंगी प्रतिपादन  
शेतकरी मेळाव्यात सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका

कळमेश्वर (Sunil Kedar) : कळमेश्वर तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या वतीने धापेवाडा येथे ‘सहकार भारत गॅस’ एजन्सीचे उद्घाटन व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अध्यक्षतेखाली तर रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्याम बर्वे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

गॅस एजन्सीमुळे ग्रामीण भागाला मोठा दिलासा
कार्यक्रमात बोलताना खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष बाबाराव कोढे यांनी सांगितले की, सन 2013 मध्ये भारत गॅस एजन्सीसाठी अर्ज केल्यानंतर अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. लॉटरी लागूनही तांत्रिक कारणांमुळे प्रस्ताव रद्द झाला होता. मात्र न्यायालयीन लढाई जिंकून शेवटी शेतकऱ्यांच्या संस्थेला ही एजन्सी मिळाली. या एजन्सीमुळे कळमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात नागरिकांना माफक दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होणार असून, ही सेवा सहकारी संस्थेमार्फत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून खोट्या तक्रारी केल्या जात असल्या तरी सर्व प्रक्रिया नियमांनुसार पूर्ण झाल्याने शेवटी सत्याचाच विजय झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

खत दरवाढीबाबत शेतकऱ्यांना इशारा
बाबाराव कोढे यांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खतांचे दर वाढण्याची शक्यता आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून एमआरपीमध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले. खरेदी-विक्री संस्था मात्र निर्धारित दरातच खतांची विक्री करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या धोरणांवर खासदार बर्वे यांचा हल्लाबोल
खासदार श्याम कुमार बर्वे  यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. इराण-इजराइल युद्धामुळे खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी देशाची परराष्ट्र नीती अपयशी ठरल्याचा आरोप केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना खत, बियाणे व कीटकनाशकांचे दर वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सरकार व्यापाऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सुनील केदार यांची सरकारवर टीका
माजी मंत्री सुनील केदार  यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आज देशात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून पिकांच्या भावात मात्र वाढ नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ग्रामीण भागात पाणी, वीज व रोजगाराच्या समस्या वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने जागरूक राहण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांसाठी सहकार चळवळीचे महत्त्व
कार्यक्रमात वक्त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला. कळमेश्वर खरेदी-विक्री संस्थेला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत, ही संस्था राज्यातील आदर्श संस्थांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर चे सभापती बाबाराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर चे सभापती रवींद्र चिखले मोहपा नगर परिषद चे नगराध्यक्ष माधव चर्जन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, तालुका खरेदी-विक्री समिती सावनेर चे अध्यक्ष दिलीप बनसिंगे कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर च्या उपसभापती प्रतिभा पालटकर, माझी जि प सदस्य महेंद्र डोंगरे माजी सभापती वैभव घोंगे माजी उपसभापती जयश्री वाळके राजेंद्र सुके खरेदी-विक्रीचे उपाध्यक्ष आशिष देशमुख संचालक वसंतराव राऊत दामोदर ठाकरे अशोक जीव तोडे अरविंद दहीकर प्रकाश मोहोड राजेंद्र हले विलास बेंडे विष्णू ताजने दिलीप सांबारे प्रमोद पांडव किशोर कोठेकर विजय गिरी मारोतराव दहाट शोभाताई कारभारी मायाताई झोटिंग अण्णाजी चव्हाण  विविध सहकारी संस्था, बाजार समित्या व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धापेवाडा व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धापेवाडा येथे सुरू झालेली ‘सहकार भारत गॅस’ एजन्सी ही ग्रामीण भागासाठी मोठी सुविधा ठरणार असून, शेतकऱ्यांना स्वस्त दरात गॅस व खत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे. तसेच या कार्यक्रमातून सरकारच्या धोरणांविरोधात राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळाले.

Related to this topic: