Hingoli Criminal Case: राज्य सरकारच्या नवीन सुधारित शुद्धिपत्रकानुसार, फौजदारी प्रकरणातील लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी उठून अभिवादन करण्याची गरज नाही.
शासनाचा शुद्धिपत्रकाद्वारे दणका
हिंगोली (Hingoli Criminal Case) : आमदार- खासदार कार्यालयात आले की अधिकाऱ्यांनी उठून उभे राहून सलामी द्यावी हा नियम आता बदलला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 एप्रिल रोजी काढलेल्या सुधारित शुद्धिपत्रकानुसार, फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरलेल्या किंवा चौकशीसाठी बोलावलेल्या लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी उठून अभिवादन करण्याची गरज नाही.
पूर्वीच्या 20 नोव्हेंबर 2025 च्या परिपत्रकात आमदार-खासदार भेटायला आल्यावर व परत जाताना अधिकाऱ्यांनी उत्थापन देऊन अभिवादन करावे, असे नमूद होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. नव्या सूचनेनुसार, एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी प्रकरणात (Hingoli Criminal Case) दोषी असेल, अपीलकार किंवा पक्षकार म्हणून चौकशीसाठी आला असेल, किंवा निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यालयात आला असेल, तर त्याला VIP वागणूक मिळणार नाही. अशा वेळी अधिकाऱ्यांनी त्याला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक द्यावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
सन 2015 ते 2021 दरम्यानच्या सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण करून हे सुधारित मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आले आहे. (Hingoli Criminal Case) लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव होऊ नये, कायदा सर्वांसाठी समान असावा हा यामागचा हेतू असल्याचे शुद्धिपत्रकात म्हटले आहे. हे शुद्धिपत्रक http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने जारी झाले आहे.