Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

क्रांतिकारी शेतकरी संघटना

डीएपी तुटवड्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

Krantikari Shetkari Sanghatana: हिंगोलीत डीएपी खताच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल; क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांना निवेदन दिले.


डीएपी तुटवड्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

Krantikari Shetkari Sanghatana |

हिंगोली (Krantikari Shetkari Sanghatana) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्माण झालेल्या डीएपी खताच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी १२ मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे ठिय्या मांडत निवेदन दिले.
 
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नाही. काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून खत साठवून ठेवले जात असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिवसभर कृषी केंद्रांचे चकरा माराव्या लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रशासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर पुरेशा प्रमाणात डीएपी खत उपलब्ध करून द्यावे व साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली. तसेच उद्याही जिल्ह्यातील (Krantikari Shetkari Sanghatana) शेतकर्‍यांना डीएपी खत उपलब्ध झाले नाही आणि काही व्यापार्‍यांनी खताचा साठा करून ठेवला असल्याचे आढळून आले, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना संबंधित कृषी केंद्रावर जाऊन शेतकर्‍यांना डीएपी खत वाटप करण्याचा निर्णय घेईल, असा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

याशिवाय जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट तसेच जिप्समच्या नावावर बोगस खतांची विक्री चालू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आले असून यावर अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. या सर्व प्रकारांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे. हे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटना, जिल्हा हिंगोली यांच्यातर्फे देण्यात आले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे, नामदेव ल. घुले, सचिन रा. मते, विठ्ठल वामुधोरे व सुनील पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते. 

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे (Krantikari Shetkari Sanghatana) संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी हा लढा सुरू आहे. निवेदनानंतर  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रदिप कच्छवे यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी कृषि अधिकारी वायसे, गुणनियंत्रक काळे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

Related to this topic: