Kalamnuri Water Scarcity: अधिकृत पाणीपुरवठ्यापासून दूर असलेल्या गुत्तेदारीकडून नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे संदर्भात नगरपालिका आणि स्थानीय प्रशासनावर आरोप वाढत आहे.
आठ-आठ दिवस पाणीटंचाई;
नगरपालिकेच्या मुख्य टाकीतील लिकेज हजारो लिटर पाणी टँकरने घेऊन जात आहे
कळमनुरी (Kalamnuri Water Scarcity) : कळमनुरी शहरातील नागरिकांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे नगरपालिकेच्या मुख्य पाणीटाकी परिसरातून "लिकेज पाणी" असल्याचे सांगून हजारो लिटर पाणी गुत्तेदाराकडून टँकरद्वारे नेले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुख्य पाणीटाकी काही अंतरावर असलेले ईसापुर कमानाजवळ मोठा खड्डा करून त्यामध्ये इंजिन बसविण्यात आले असून, तेथून दररोज चार ते पाच टँकर पाणी रस्त्यावरील कामांसह इतर बांधकामांसाठी नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसताना, दुसरीकडे हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या वापरासाठी दिले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचारी आणि गुत्तेदार यांच्यात संगनमत असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे. तसेच या (Kalamnuri Water Scarcity) प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून, "लिकेज"च्या नावाखाली नेमके किती पाणी वापरले जात आहे, ते कोणाच्या परवानगीने दिले जात आहे, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.