Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी पाणीटंचाई

लिकेजच्या नावाखाली हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या घशात?

Kalamnuri Water Scarcity: अधिकृत पाणीपुरवठ्यापासून दूर असलेल्या गुत्तेदारीकडून नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे संदर्भात नगरपालिका आणि स्थानीय प्रशासनावर आरोप वाढत आहे.


लिकेजच्या नावाखाली हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या घशात

Kalamnuri Water Scarcity |

 

आठ-आठ दिवस पाणीटंचाई;
नगरपालिकेच्या मुख्य टाकीतील लिकेज हजारो लिटर पाणी टँकरने घेऊन जात आहे

कळमनुरी (Kalamnuri Water Scarcity) : कळमनुरी शहरातील नागरिकांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे नगरपालिकेच्या मुख्य पाणीटाकी परिसरातून "लिकेज पाणी" असल्याचे सांगून हजारो लिटर पाणी गुत्तेदाराकडून टँकरद्वारे नेले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुख्य पाणीटाकी काही अंतरावर असलेले ईसापुर कमानाजवळ मोठा खड्डा करून त्यामध्ये इंजिन बसविण्यात आले असून, तेथून दररोज चार ते पाच टँकर पाणी रस्त्यावरील कामांसह इतर बांधकामांसाठी नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसताना, दुसरीकडे हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या वापरासाठी दिले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचारी आणि गुत्तेदार यांच्यात संगनमत असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे. तसेच या (Kalamnuri Water Scarcity) प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून, "लिकेज"च्या नावाखाली नेमके किती पाणी वापरले जात आहे, ते कोणाच्या परवानगीने दिले जात आहे, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: