MLA Bhimrao Keram: अतिवृष्ठीप्रभावाने माहूर-किनवट या परिसरातील रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले. जनजीवन व सुरक्षितता याचे खूप असणारे परिणाम देणार आहेत
माहुर (MLA Bhimrao Keram) : किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रमुख रस्ते, पूलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून अनेक गावांचा संपर्क धोक्यात आला आहे तर अर्धवट असलेले कामे तातडीने पूर्ण मार्गी लावा अन्यथा कारवाईस सामारे जा असा इशारा आ. भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे.
मतदारसंघातील परिस्थितीची गंभीर दखल घेत आ. भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांना तातडीने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत तर नुकसानग्रस्त सर्व रस्ते, पूल व पुलियांची तात्काळ संयुक्त पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करावा, दुरुस्तीची कामे कोणताही विलंब न करता पूर्ण करावीत तसेच वाहतुकीस धोका निर्माण झालेल्या ठिकाणी तात्पुरते पर्यायी मार्ग, इशारा फलक व आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा अथवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते व पूल लवकरात लवकर वाहतुकीस खुले करावेत, अन्यथा उद्भवणाऱ्या गैरसोयीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असे आमदार भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने प्रभावी कार्यवाही करून जनजीवन पूर्ववत सुरळीत करावे, असेही आमदार भीमराव केराम यांनी निर्देशित केले.