Breaking News
  • भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी, पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद
  • नागपूरात महाल येथील बडकस चौकापासून काही अंतरावर असलेल्या आयचित मंदिर परिसरात एका व्यक्तीवर चाकू हल्ला, उपचार सुरु
  • पुण्याच्या भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका
  • कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; काही तासांत १३० नागरिकांना चावा
  • नाशिकमध्ये हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला
  • नाशिक- मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू
  • स्मार्ट मीटरविरोधात मालवण-वायरी ग्रामस्थ आक्रमक, महावितरणच्या कार्यालयात ग्रामस्थांचा धडक मोर्चा
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Kalidas Maharaj

परभणीवर शोककळा! श्रीक्षेत्र गुंजचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे भीषण अपघातात निधन; भाविकांमध्ये हळहळ

परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत दुःखद घटना घडली आहे.


परभणीवर शोककळा श्रीक्षेत्र गुंजचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे भीषण अपघातात निधन भाविकांमध्ये हळहळ

Kalidas Maharaj |

छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपास परिसरात कारचा अपघात; स्मिता बोरीकर यांचाही मृत्यू, चालक गंभीर जखमी; मंत्री मेघना बोर्डीकर यांची श्रद्धांजली

परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्तसंप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे आज पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भाविकांमध्ये शोककळा पसरली असून श्रीक्षेत्र गुंज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेलेले कालिदास महाराज आपल्या सहकाऱ्यांसह परतीच्या प्रवासात होते. याचदरम्यान बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कालिदास महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कालिदास महाराज यांनी गेली चार दशके अखंड मौनव्रत स्वीकारून अध्यात्म, सेवा आणि समाजप्रबोधनासाठी आयुष्य वाहिले होते. दत्तसंप्रदायाच्या विचारांचा प्रसार करत त्यांनी असंख्य भक्तांना अध्यात्माची प्रेरणा दिली. व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि लोककल्याणाचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिल्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदराचे स्थान निर्माण झाले होते.

मौनव्रत असूनही राज्यभरातील हजारो भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे त्यांच्या दर्शनासाठी येत असत. साधी राहणी, संयमी जीवनशैली आणि अध्यात्मिक मार्गदर्शनामुळे त्यांनी अनेकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच धार्मिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही सोशल मीडियावरून कालिदास महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, श्रीक्षेत्र गुंज येथील परमपूज्य कालिदास महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगरजवळ झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेचा संदेश देणारे कालिदास महाराज यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, असे त्यांनी नमूद केले.

 

Related to this topic: