Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पाणीटंचाई समस्या

कंत्राटदाराच्या व कार्यकारी अभियंताच्या नाकर्तेपणामुळे काजळेश्वर वरखेड गावातील जनतेचे पाण्यासाठी हाल

Water Scarcity Problem: काजळेश्वर व वरखेड गावातील जनतेच्या पाणीटंचाईची समस्या अद्याप सुटली नाही, कंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे गावकरी त्रस्त.


कंत्राटदाराच्या व कार्यकारी अभियंताच्या नाकर्तेपणामुळे काजळेश्वर वरखेड गावातील जनतेचे पाण्यासाठी हाल

Water Scarcity Problem |

शासकीय आदेश व नियमांची  ऐशीतैशी!
जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोशीला वाचविण्याचे प्रयत्न
खासदार व आमदारांनी दिले सीईओ ला चौकशीचे निर्देश

बार्शीटाकळी (Water Scarcity Problem) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे,हरघर  जल ही योजना जनतेच्या हितासाठी राबवित आहे. परंतु कंत्राटदार व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शासकीय आदेश व नियमाचे उल्लंघन करत "स्वतःच्या मर्जीने,वाटेल त्या पद्धतीने "पाणीपुरवठा योजनेचे काम करण्याचे प्रयत्न चालविल्याने काजळेश्वर व वरखेड गावातील जनतेचे (Water Scarcity Problem) पाण्यासाठी हाल होत आहेत. अकोल्याचे खासदार अनुपधोत्रे व मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांना तात्काळगावातील जनतेलापाणी उपलब्ध केल्यानंतर दोशीवर  कारवाई करावी . अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. 

बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर व वरखेड गावातील जनतेची पाणीटंचाईची समस्या कायम स्वरूपात सुटावी म्हणून, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत जलजीवन मिशनचे तीन कोटी 24 लाख 69 हजार 600 रुपये खर्चाची योजना मंजूर झाली होती. कंत्राटदार गजानन डी देशपांडे यानी सदर योजनेचे कंत्राट मिळविल्यानंतर दिनांक 10 ऑगस्ट 2022 ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत सदर योजनेचे काम पूर्ण करणे आवश्यक व बंधनकारक होते. परंतु दिनांक 18 मार्च 2026 पर्यंत सदर योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे या गावातील जनतेला पाणी (Water Scarcity Problem) उपलब्ध होऊ शकले नाही. याबाबत गावातील जनतेने संबंधिताशी विचारणा केली असता ते उलट सुलट अपमानास्पद शब्दाचा वापर करून अरेरावीची भाषा करत आहेत. 

सदर योजनेचे काम हे शासकीय इस्टिमेट प्रमाणे झाले नसून, पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम हे साडेतीन फूट खोलवर असणे आवश्यक असताना काही ठिकाणी जमिनीवर तर काही ठिकाणी एक ते दीड फूट खोल अंतरावर पाईपलाईन टाकल्याने, सदर पाईपलाईन फुटण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर कामाची तात्काळ चौकशी करून शासकीय इस्टिमेट प्रमाणे काम करण्यात यावे, तसेच सखोल कामाची चौकशी करून दोशीवर कारवाई करून गावातील जनतेला तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे.

अशा प्रकारची तक्रार गावचे उपसरपंच तथा बार्शीटाकळी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस योगेश कोंदनकार यांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडे दिनांक 27 फेब्रुवारीलाकेली होती .परंतु अकोला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अतुल सोनवणे व कंत्राटदाराची मिली भगत असल्याने,अद्याप पर्यंत गावातील जनतेला पाणी मिळाले नाही, आणि या योजनेच्या कामाची कोणतीच चौकशी झाली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांनी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे चौकशी करून कारवाईचे व गावातील जनतेला तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

गावातील जनतेला लवकरच पाणी मिळेल...
या गंभीर प्रकरणासंदर्भात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अतुल सोनवणे यांच्याशी चर्चा केली असता लवकरच या गावातील जनतेला पाणी मिळेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related to this topic: