Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

जांभोरा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रखडली; पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.


जांभोरा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रखडली पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

Jambhora Dam |

निधी उपलब्ध, निविदा प्रक्रिया पूर्ण; तरीही कामाला मुहूर्त मिळेना..!

सिंदखेडराजा (Jambhora Dam) : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, प्रशासकीय दिरंगाईमुळे यावर्षीही शेतीचे नुकसान होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

गेल्यावर्षी १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाचा हा पाझर तलाव फुटला होता. या दुर्घटनेत परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तलाव फुटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न तर निर्माण झालाच, पण आगामी पावसाळ्यात पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तलावाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र, तरीही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 'आपल्या मर्जीतील' कंत्राटदाराला काम देण्यासाठी हे प्रकरण रखडवले जात असल्याची चर्चा परिसरात आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत काम सुरू झाले तरी ते वेळेत पूर्ण होईल का?

घाईघाईत केल्या जाणाऱ्या कामाच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात दैनिक देशोन्नतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही

प्रशासकीय संभ्रम:

निविदा प्रक्रिया होऊनही काम का थांबले आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.जबाबदार अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन, पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावाची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी जांभोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

"तलाव फुटल्यामुळे आमचं आधीच मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा पावसाळा येतोय, पण प्रशासनाला जाग आलेली नाही. या तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती झाल्यास तलाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार - रमेशराव खरात स्थानिक शेतकरी, जांभोरा

Related to this topic: