Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

मोजा हिंगण येथे जलयुक्त शिवार २.० अंतर्गत जलतारा शोष खड्ड्यांच्या कामाचा शुभारंभ

चालू वर्षात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


मोजा हिंगण येथे जलयुक्त शिवार २० अंतर्गत जलतारा शोष खड्ड्यांच्या कामाचा शुभारंभ

Jalyukt Shivar 2.0 |

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

पातूर (Jalyukt Shivar 2.0) : चालू वर्षात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी तसेच गावातील भूजल पातळी टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत मौजे हिंगण येथे जलतारा शोष खड्ड्यांच्या निर्मितीच्या कामाला उत्साहात सुरुवात करण्यात आली.

हे काम पातूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी मनोज मधुकर पेंढारकर यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून कामाचा शुभारंभ केला तसेच शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.

जमिनीची जलधारण क्षमता वाढणार

यावेळी बोलताना कृषी अधिकारी मनोज पेंढारकर यांनी सांगितले की, जलतारा शोष खड्ड्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच जमिनीची जलधारण क्षमता मजबूत झाल्याने उन्हाळ्याच्या काळात आणि पावसाच्या खंडाच्या कालावधीतही विहिरी व कूपनलिकांना पाणी उपलब्ध राहण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामात लहान-मोठ्या सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित श्रमदान आणि सहकार्य केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू झालेल्या या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार असून, शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दिशेने गावाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

Related to this topic: