Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीमच्या जयघोषात जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar: हिंगोली जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. विविध उपक्रमांसह, पोलिस बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पडला.


जय भीमच्या जयघोषात जिल्ह्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar |

हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात आज 14 एप्रिल ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र भीमसैनिकांनी एकजुटीने जयंतीचा आनंद साजरा केला. पहाटेपासूनच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानिमित्त ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. बँड, ढोल-ताशाच्या दणदणाटात आणि ‘जय भीम’च्या जयघोषात तरुण-तरुणींसह आबालवृद्ध भीमसैनिक तल्लीन झाले होते. अनेक ठिकाणी भीमगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते. (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरातील प्रमुख चौक, पुतळा परिसर आणि मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली होती. पोलिसांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात जयंतीचा उत्सव कोणताही गालबोट न लागता अत्यंत उत्साहात आणि शांततामय वातावरणात पार पडला. ठिकठिकाणी सामाजिक संघटनांनी अन्नदान, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.

Related to this topic: