Breaking News
  • शिवसेना नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे 5 जूनला नंदुरबार दौऱ्यावर
  • 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प
  • दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगरपालिका

हिंगोली आंबेडकर नगरातील महिला रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत धडकल्या

Hingoli Municipality: हिंगोली शहरातील आंबेडकर नगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सोमवारी महिलांसह अनेक पुरुष रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत


हिंगोली आंबेडकर नगरातील महिला रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत धडकल्या 

Hingoli Municipality |

 

पाच दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा

हिंगोली (Hingoli Municipality) : हिंगोली शहरातील आंबेडकर नगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सोमवारी महिलांसह अनेक पुरुष रिकाम्या हंड्यासह नगरपालिकेत दाखल होताच अनेकांची धांदल उडाली होती. 

हिंगोली शहरातील आंबेडकर नगर मध्ये पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे त्यातही नळाला अवघी पाच ते दहा मिनिटेच पाणी येत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी थेट रिकाम्या हंड्यासह नगरपरिषद करण्यात धाव घेतली यावेळी नगरपरिषदेला दिलेले निवेदन उपमुख्य अधिकारी साबळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता बाळू बांगर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. भर उन्हात लहान मुले आणि वृद्धांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. 

नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे कळकळीची विनंती केली आहे की, आंबेडकर नगरचा (Hingoli Municipality) पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. तसेच, येत्या पाच दिवसांत यावर ठोस उपाय न झाल्यास आंबेडकर नगर येथील नागरिक आंदोलन करतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

हे निवेदन राहुल खिल्लारे, अरविंद ढाले, अनिल टिपरे, सतिश बलखंडे, रोहन ढगे, निखिल दिपके आणि नागेश खडसे यांच्यासह सर्व आंबेडकर नगर रहिवाशांच्या वतीने देण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या या प्रश्नाकडे नगरपालिका गांभीर्याने लक्ष देते की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.