Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जलेश्वर तलाव

कोट्यवधी रुपये खर्चातून जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण, अनेक पथदिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य

Hingoli Jaleshwar Lake: जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणात कोट्यवधी खर्च झाला, परंतु पथदिव्यांचा लखलखाट सोडून गेला. पथदिवे बंद झाल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षितता धोकादायक


कोट्यवधी रुपये खर्चातून जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण अनेक पथदिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य

Hingoli Jaleshwar Lake |

हिंगोली (Hingoli Jaleshwar Lake) : शहराच्या मध्यवर्ती भागातील जलेश्वर तलावाचे कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले. तलावाभोवती संरक्षण भिंत, सिमेंट रस्ता आणि आकर्षक विद्युत खांब उभारून परिसर झगमगाट करण्यात आला होता. नंदी आणि त्रिशूलाच्या कलाकृती असलेले हे पथदिवे तलावाच्या सौंदर्यात भर घालत होते. मात्र सध्या या परिसरात चित्र वेगळेच दिसत आहे.

सुशोभीकरणानंतर सुरुवातीच्या काळात तलावाच्या चोही बाजूने पथदिव्यांचा लखलखाट दिसत होता. संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत आहेत. संपूर्ण मार्गावर बोटावर मोजण्याइतकेच पथदिवे सुरू असून रात्रीच्या वेळी संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. 

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, लाखो रुपये खर्च करून बसवलेले दिवे देखभालीअभावी बंद पडले आहेत. (Hingoli Jaleshwar Lake) अंधारामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. तलाव परिसरात असामाजिक तत्वांचा वावर वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. सुशोभीकरणाचा मुख्य उद्देशच अंधारामुळे फोल ठरत आहे. 

नगर परिषदेने कोट्यवधींचा निधी खर्च करून तलाव परिसर विकसित केला, पण दुरुस्ती आणि देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पथदिवे बंद पडून अनेक महिने उलटले तरी प्रशासनाचे याकडे लक्ष गेलेले नाही. तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

“इतका खर्च करून जर दोन दिवस प्रकाश राहत नसेल तर या सुशोभीकरणाला अर्थ काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तलाव परिसरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करून रात्रीच्या वेळी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात हा परिसर अंधारातच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासन याची दखल घेऊन बंद पडलेले पथदिवे कधी सुरू करणार याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: