Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली भुकंप

भुकंपाच्या धक्याने हिंगोली जिल्हा हादरला; ४.६ रिस्टर स्केलची नोंद

Hingoli earthquake: हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंधा नागनाथ, कळमनुरी येथे मध्यरात्री चार सहज भुकंप झाल्या. नागरिकांनी घराबाहेर धावले. खोरत आणि भिंती तडपण्याचा समस्या पटले.


भुकंपाच्या धक्याने हिंगोली जिल्हा हादरला ४६ रिस्टर स्केलची नोंद

Hingoli earthquake |

 

भुकंपाच्या धक्याने नागरिकांची घराबाहेर धाव; प्रशासना कडुन नुकसानीची पाहणी

हिंगोली (Hingoli earthquake) : जिल्ह्यात भुकंपाची मालीका सुरु असताना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सलग चार भुकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेवुन रात्र जागुन काढली.

हिंगोली जिल्ह्यामध्ये अधून मधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. विशेष करुन वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी या तीन तालुक्यात प्रामुख्याने जमिनीतुन गुढ आवाज बाहेर येणे व भुकंपाचे धक्के ही बाब नित्याचीच झाली आहे. गुरुवारी ९ जुलै रोजी मध्यरात्री १.३६ वाजता ४.६ रिस्टर स्केलचा भुकंप झाला. वसमत तालुक्यातील शिरली हे भुकंपाचे केंद्र बिंदु असुन त्यांची खोली १० किमी आहे. हा पहिला धक्का जाणवल्यानंतर लगेचच २.१५ वाजता भुकंपाचा दुसरा धक्का जाणवला. ज्या-ज्या नागरिकांना पहिल्या भुकंपाची जाणीव झाली नाही असे नागरिक दुसऱ्या भुकंपाच्या धक्याला घराबाहेर पडले. हा दुसरा भुकंपाचा धक्का ३.६ रिस्टर स्केलचा होता.

तिसरा भुकंपाचा धक्का २.१७ मिनिटाला जाणवला तो ३.९ रिस्टर स्केलचा होता. तर ३.२३ वाजता ४.१ रिस्टर स्केलचा भुकंप झाला. या भुकंपाचा केंद्र बिंदु औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाबा हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत या तालुक्यात भुकंपाची तिव्रता अधिक जाणवली. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये देखील नागरिकांनी घराबाहेर धाव घेवुन रात्र जागुन काढली. वसमत तालुक्यातील पांगरी शिंदे येथे ६० ते ७० घराच्या भिंतींना तडे गेले. त्याच प्रमाणे औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथे एका घराची भिंत कोसळुन १५ ते २० घराच्या भिंतींना तडे गेले.

मध्यरात्री झालेल्या भुकंपाच्या धक्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अनेक ठिकाणी भेटी देवुन अधिकाऱ्यांना नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. भुकंपाच्या धक्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवु नये असे आवाहन करण्यात आले. या भुकंपामध्ये कुठेही जिवित हानी झाली नाही.

Related to this topic: